आ. खतालांवरील हल्ल्याबाबत सत्यजित तांबे काय म्हणाले

संगमनेर ( प्रतिनिधी )- संगमनेर फेस्टिव्हलच्या कार्यक्रमामध्ये आ. अमोल खताळ सहभागी झाले होते. कार्यक्रम संपवून आमदार अमोल खताळ तिथून निघाल्यानंतर प्रसाद अप्पासाहेब गुंजाळ नावाच्या एका इसमाने मुख्य प्रवेशद्वाराजवळ आ. अमोल खताळ यांच्यावर हल्ला केला असल्याची माहिती मिळाली आहे. राजस्थान युवक मंडळ आयोजित संगमनेर फेस्टिव्हलच्या समारंभावेळी आमदार अमोल खताळ यांच्यावर हा हल्ला झाला. मालपाणी लॉन्स येथे झालेल्या कार्यक्रमात उपस्थित असताना, प्रेक्षकांशी हस्तांदोलन करताना खांडगाव येथील एका व्यक्तीने हात मिळवण्याच्या बहाण्याने आमदारांवर अचानक हल्ला केला.
या हल्ल्यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. घटनास्थळी उपस्थितांनी हल्लेखोराला चोप दिल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. ह्या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. तसेच ह्या घटनेनंतर आमदार अमोल खताळ यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आव्हान केले आहे.

आता नाशिक पदवीधारचे आमदार सत्यजित तांबे यांनीही आपल्या एक्स प्लॅटफॉर्मवरून ह्या हल्याचा निषेध व्यक्त केला आहे. यावेळी ते म्हणाले कि,

तसेच पालकमंत्री विखे पाटील यांनी या घटनेचा निषेध केला आहे, तसेच दोषींवर तात्काळ कारवाईचे आदेशही दिल्याचं त्यांनी सांगितले. ते म्हणाले की,

Share post:

Leave a Comment